उष: काल होता होता...

नेहमीसारखी एक सकाळ..
पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर, बाईकवरुन आलेले दोन तरुण ,
morning walk साठी निघालेल्या दाभोळकरांची हत्या करून निघुन जातात .. सगळीकडे एकच खळबळ माजते..
पुढचा आठवडाभर
'पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रतिगामीत्वावर' चर्चासत्रं झडतात..
हत्येच्या दुसर्याचं दिवशी,
ज्या जादुटोणा विरोधी विधेयकासाठी
तब्बल दहा वर्षं दाभोळकर राज्य सरकारशी संघर्ष करत होते,
जे विधेयक विधानसभेत सात वेळा मांडुनही
पारित होऊ शकलेलं नव्हतं ,
तेचं आता वटहुकूम काढुन पास केलं जातं..
हत्येचा तपास करणार्या
पुणे पोलिसांना ( तर्हेतर्हेचे उपाय करुनदेखील ) त्या दोन खुन्यांना शोधणं जमत नाही..
मग तब्बल ९ महिन्यांनी हाय कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर,
तपास CBI कडे सोपवला जातो..
आता हत्येला एक वर्षपूर्ण झालेलं असत..ं
खुनी अजुनही याच समाजात उजळ माथ्याने फिरत असतात..
वटहुकूमाचा (कसा का असेना)
कायदा झालेला असतो..
पहिला स्म्रति दीन म्हणून पुन्हा दाभोळकरांना श्रद्धांजली वाहिली जाते..
पुन्हा मोर्चे निघतात..
चर्चासत्रं झडतात..
आणि दिवस मावळला की दाभोळकरांच्या स्म्रतिंवर आणि सरकारच्या निष्क्रियते वर पुन्हा पडदा पडतो..
आणि त्यावरची धूळ थेट पुढच्या स्म्रतिदीनाची वाट पाहत राहते ..!marathiblogs.inmarathiblogs.in

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट